BY:मच्छिन्द्र टिंगरे
बारामती तालुक्यात लग्न होत नसलेल्या तरुणांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आणण्याचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी खेळणारी व आर्थिक लूट करणारी टोळी समोर आली आहे. या टोळीत तीन महिला व चार पुरुषांचा समावेश असून त्यांनी अनेक भाबड्या तरुणांची व त्यांच्या कुटुंबीयांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येतं आहे. याप्रकरणी झारगडवाडी. ता. बारामती येथील एका तरुणाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.
तक्रारीनंतर उघडकीस आलेलं मोठं जाळं
एका तरुणाने “लग्न करून देतो” या आमिषाला बळी पडून मोठी रक्कम गमावली. एजंट आणि एम. आय. डी. सी. मधील एक महिला वं तिची मुलगी यांनी अनेक तरुणांना गंडा घातला असल्याचे चर्चा आहे. या मुलीचे पाहिले लग्न झाले असताना त्याचा घटस्फोट झालेला नसताना झारगडवाडी येथील एका तरुणाबरोबर परत लग्न केले. लग्न होताचं तिसऱ्या दिवशी मुलीच्या आईने मुलाला वं त्याच्या भावाला पैसे मागायला सुरवात केली. दोन महिन्यात मुलगी माहेरला जाऊं लागली. याप्रकारणावर मुलाला संशय आल्यावर त्यानें चौकशी केली असता या मुलीचे पाहिले लग्न झाले आहे आणि त्याचा घटस्फोट झाला नसताना तक्रारदार मुलाशी लग्न केले असल्याचे समोर आले.
या प्रकरणी मुलाने आता बारामती तालुका पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. याबाबतीत पोलिसांनी घेतलेल्या प्राथमिक माहितीत घडलेला प्रकार खरा आहे. मात्र या टोळीने आणून कोणाला फसवले आहे कां याबाबत माहिती घेतली जात आहे.
टोळीची कार्यपद्धती..
या टोळीतील पुण्यात राहणारी एक महिला आणि बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारे तीन तरुण लग्न होतं नसलेल्या मुलांशी दोस्ती करून त्याना लग्नासाठी मुलगी आहे असे सांगून लग्न लावायचे असेल तर एक किंवा दोन लाख रुपये द्यावे लागतील असं सांगतात.या प्रकरणी ही या टोळीने एक लाख रुपये घेतले.लग्न लावल्यानंतर पुढे ही या मुलाकडून पैसे मिळतील अशा असलेली महिला आणि मुलगी यांनी काढता पाय घेतला. दरम्यान या टोळीने अजून काही तरुणांकडून लग्न लावून देतो म्हणून पैसे उकळले असल्याची माहिती समोर येतं आहे.






