BY:मच्छिन्द्र टिंगरे
या कथित घोटाळ्यातील जमीन विक्री करणारी शितल तेजवानी आणि तिचा नवरा एडवोकेट सागर सूर्यवंशी यांनी या कथेत घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण दस्तातील बहुतांश कागदपत्र बोगस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शितल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी या नवरा बायकोच्या जोडीने पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचे नऊ ते दहा गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शितल तेजवानी आणि तिचा नवरा एडवोकेट सागर सूर्यवंशी यांनी आत्तापर्यंत प्रशासनातलं एकही कार्यालय ठेवलं नाही की तिथं फसवणूक झाली नाही. या कथेत जमीन घोटाळ्यातील बहुतांश कागदपत्र बनावट असल्याची माहिती समोर येत आहे याच बनावट असलेल्या कागदपत्रांच्या आधारे शितल तेजवानी हिने पार्थ पवारांना ही जमीन आपल्या ताब्यात आहे असं सांगितलं आणि या जमिनीचे मूल्यांकन 1800 कोटी रुपये असून ती फक्त 300 कोटी रुपयांना विकायचे आहे असा निरोप दिला. एवढी प्राईम लोकेशनची महत्त्वाची जागा 300 कोटी रुपयांमध्ये मिळते आहे. या आमिषाला बळी पडून पार्थ पवार यांच्या कंपनीने शितल तेजवानी यांच्याबरोबर याचा व्यवहार केला. सूत्रांची माहिती अशी आहे की या व्यवहारांमध्ये काही कोटी रक्कम कॅश मध्ये ऍडव्हान्स दिल्याचं बोललं जात आहे. उरलेली रक्कम दस्ताची नोंद झाल्यानंतर देण्याची ठरले होते अशी ही माहिती समोर येत आहे.
या अगोदर शितल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांनी कोरेगाव पार्क येथील मनीष मिलानी यांनाही अशाच प्रकारे फसवले होते… याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मनीष मिळाली हे एडवोकेट सागर सूर्यवंशी यांचे क्लाइंट होते जमिनीच्या प्रकरणांमध्ये कोर्टातील कामकाज पाहण्यासाठी सागर सूर्यवंशी यांची नेमणूक केलेली होती. मनीष मुलानी यांची विमान नगर परिसरात जवळपास 69 एकर जमीन होती त्यापैकी काही जमीन आपल्याला द्यावी अशी मागणी सागर सूर्यवंशी यांच्याकडून केली जात होती. सागर सूर्यवंशी यांच्या वाढत्या डिमांड पाहून मनीष मुलानी यांनी त्यांच्याकडून वकील पत्र काढून घेतले. मनीष मिलानी यांनी वकील पत्र काढून घेतल्यानंतर एडवोकेट सागर सूर्यवंशी याने भिवंडी आणि मुंबई येथील काही महिलांना हाताशी धरून मनीष मिलानी यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल केले. मात्र या गुन्हा यांच्या घटनांच्या तारखांच्या दिवशी मनीष मिलानी हे अमेरिकेमध्ये होते हे सिद्ध झाल्यावर ती हे गुन्हे माघारी घेण्यात आले. त्यावेळी मनीष मिलानी यांनी एडवोकेट सागर सूर्यवंशी आणि संबंधित कथित महिला यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत.
2) यातील दुसरे प्रकरण म्हणजे रोजरी एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून एडवोकेट सागर सूर्यवंशी यांची नेमणूक केली होती. नंतर याच संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी एडवोकेट सागर सूर्यवंशी याची पत्नी शितल तेजवानी यांचे बरोबर फॅसिलिटी एग्रीमेंट करण्यात आले होते दरम्यान संस्थेचे पदाधिकारी विनय आराहाणा यांचे बरोबर शितल तेजवानी यांचे वादविवाद झाल्यामुळे आराना यांनी एडवोकेट सागर सूर्यवंशी व शितल तेजवानी यांच्या वरती दावा दाखल केला होता. या दाव्या हा दावा काढून घेण्यासाठी विनय आ रहा ना व विवेक आराना यांच्या सहीचे बोगस ऍपिटवीट करून कोर्टात दाखल करण्यात आले होते या बोगस एफिडेविट वर आराना पिता-पुत्रांच्या सह्या शितल तेजवानी यांनी केल्या होत्या या घटनेत कोर्टाने सागर सूर्यवंशी व शितल तेजवानी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
यासारखे अनेक गुन्हे शितल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांनी केले आहेत वाहन घेण्यासाठी चे कर्ज जवळपास तीन कोटी रुपयांचे काढले होते क्रेडिट कार्ड व वेगवेगळ्या बँकांची कर्ज काढून अनेक बँकांना गंडा घातल्याची ही प्रकरण या दोघांची समोर येत आहेत.
दरम्यान पार्थ पवार यांनाही या बंटी बबली च्या जोडीने कितीचा गंडा घातला आहे हे आता पहावे लागणार आहे. मात्र या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामीला सामोरे जावं लागलं आहे. याशिवाय आता कंपनीला दस्त रद्द करण्यासाठी 42 कोटींचे मुद्रांक शुल्कही भराव लागणार आहे. त्यामुळे या घटनेत नेमकं काय समोर येतं ते पाहावं लागणार आहे. असून पार्थ पवार यांना या जोडीने किती कोटींचा गंडा घातला याची चर्चा आता सुरू आहे.









